बंद

    राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान

    • तारीख : 12/04/2005 -

    परिचय

    योजना सुरू झाल्याचा दिनांक दि.१२ एप्रिल २००५
    भारत सरकारने दि.१२ एप्रिल २००५ रोजी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबविण्यास सुरवात केली. ग्रामीण भागातील गरिब महिला आणि मुलांपर्यंतगुणवत्तापुर्ण, अद्यावत व परिणामकारक आरोग्य सेवा पुरेशा प्रमाणातपोहोचविणे हे या मिशनचे ध्येय आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हा सातवर्षामध्ये राबविला जाणारा कार्यक्रम आहे. या विशिष्ट कालमर्यादेतअभियानात गाठलेल्या उदिदष्टयांचा प्रगती अहवाल सरकारद्वारे केला जाईल.

    • अर्भकमृत्यू दर आणि माता मृत्यू दर कमी करणे.
    • सार्वजनिक स्वच्छता, पोषक आहार, पाणीपुरवठा यासारख्या मुलभूत सेवांबाबत सार्वजनिक आरोग्य सेवा सुलभतेने उपलब्ध करुन देणे.
    • स्थानिक आरोग्य नियंत्रणाबरोबरच इतर संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचा प्रतिबंध आणि नियंत्रण करणे.
    • सर्व लोकांना प्राथमिक आरोग्य सेवा मिळणेबाबत उपाययोजना आखणे.
    एकुण जननदर कमी करणे उदिदष्टये व गाठावयाची उदिदष्टये
    अ.क्र. आरोग्य निर्देशांक भारत महाराष्ट्र
    अर्भक मृत्यू दर 39 (२०११-१३) 22 (२०११-१३)
    माता मृत्यू दर १६७ (२०११-१३) ६८ (२०११-१३)
    एकुण जनन दर २.३ (२०१४) १.८ (२०१४)

    स्रोत स्रोत :- एसआरएस

    उदिदष्टये गाठण्यासाठी अभियांनातर्गत अवलंबिलेली काही प्रमुख धोरणे

    • आरोग्य सेवेअंतर्गत होणारा एकुण खर्च जी.डी.पी.च्या सध्याच्या ०.९ टक्के वरुन २ ते ३ टक्के पर्यंत वाढविणे.
    • सार्वजनिक आरोग्य सेवांचे पालकत्व, नियंत्रण व व्यवस्थापन स्थानिकसंस्थांकडून व्हावे यासाठी पंचायत प्रतिनिधीचे प्रशिक्षण घेऊन त्यांनायाविषयी अवगत करणे.
    • प्रत्येक गावामध्ये महिला आरोग्य कार्यकर्ती आशा ची निवड करणे.
    • ग्राम, आरोग्य,पोषण, स्वच्छता व पाणीपुरवठा समितीच्या माध्यमातून प्रत्येक गावात ग्राम आरोग्य योजना बनवणे.
    • उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील सेवांचा दर्जा सुधारणे. (आयपीएचएस इयत्ता.)
    • स्थानिक पातळीवर ग्राम आरोग्य नियोजन आराखडा बनविणे व त्यांची अंमलबजावणी करणे.
    • सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये स्थानिक पारंपारिक उपचार पध्दती, आयुष (आर्युर्वेद, रोग, निसर्ग उपचार, युनानी, सिध्द, होमीओपॅथी) यांचा समावेशकरणे.
    • विविध समांतर (व्हर्टीकल) आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यक्रमांना राष्ट्रीय राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर एकात्मिक रुप देणे.

    लाभार्थी:

    वर उल्लेख केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर उल्लेख केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा